Sunday, 1 July 2018

नाममहात्म्य

नाममहात्म्य

( आड ) नावात काय असतं ? या लेखात आडनावाची रंजकता मी मांडली होती . आडनावात इतिहास , आख्यायिका , वैशिष्टय पूर्णता असते . काही आडनावे निर्थकही असतात . पण आपली ओळख असणारे नाव हे विशेष नाम असते . त्यामागेही परंपरा , संस्कृती असते . भक्तीभाव किंवा विचार , संस्कारही असतात . माझे नाव शंकर . हे ठेवण्यामागे आई वडीलांची श्रध्दा दिसून येते . माझ्याआधीची अपत्ये जगत नव्हती . आईवडील नारोशंकराला गेले . नवस केला . मुलगा झाला तर त्याचे नाव शंकर ठेवू . आम्ही जन्मलो , जगलो . शंकर या नावाची अशी अख्यायिका आई सांगते . शंकराचे नाव महादेव . त्याचा अपभ्रंश महादू . विरुपाक्ष हे नावही शंकराचेच . निलकंठ , निलेश हे नावही याच परंपरेतले . देवतांच्या नावावरुन मुलांना नावे दिल्याची हजारो उदाहरणे सापडतात . गणांचा अधिपती तो गणपती . एकट्या गणपतीची कितीतरी नावे मुलांना ठेवलेली दिसतील . गणेश , गणपती , गजानन अशी चिक्कार नावे सांगता येतील . हेरंब हे नावही गणेशाचेच . पण वक्रतुंड , एकदंत अशी गणपतीची नावे काही व्यक्तीनामात सापडत नाही . मारोती , बजरंग ही नावे मुलांना शोभतात . राम, रामचंद्र ,रामभाऊ ही देवतेचीच . एखाद्या व्यक्तीचे नाव रावणही असू शकेल . पण दशानन सापडणार नाही . दशमुखे हे आडनाव असू शकेल . विष्णू , दत्त या देवतांवरुनही नावे सापडतात .  लक्ष्मी , रेणुका , अंबा , सरस्वती ही स्ञीनामे देवतेचीच . मुलींच्या नावातही देवता महात्म्य सापडते . ग्रामीण भागात वारकरी परंपरा मानणा-या माणसांनी मुलांना विठ्ठल , विठोबा. मुलींना रुक्मिणी , रखमा ही नावे दिली . आमचेकडे शिक्षणाने अद्याक्षरावरुन ओळख सांगण्याची प्रथा पडली . एस एम जोशी हे श्रीधर महादेव जोशी आहेत हे कुणाला माहित नसते . तसेच प्राचार्य पी व्ही रसाळ हे आमचे मिञ . मी पी. व्ही. या अद्याक्षरातील नावाचा शोध घेतला तेंव्हा पी फाॅर पुंडलिकचा उलगडा झाला . साहजिक विठ्ठलाचा व्ही झाला . विठ्ठलाच्याच घरात पुंडलिक आणि जनाबाईही होतीच . पंढरपूर म्हणजे विठ्ठलाची पंढरी . पंढरी , पंढरीनाथ ही नावेही वारकरी परंपरेतली . पांडुरंग हा विठ्ठलच . विठ्ठलाचे भक्त असणारे निवृत्ती ,ज्ञानेश्वर (ज्ञानोबा ) , सोपान , मुक्ताबाई , एकनाथ , नामदेव , तुकाराम ही विशेष नामेही वारकरी परंपरेतून आली . सावळया विठठ्लाचे नावावरुन सावळीरामही आलेच . नाथ परंपरेतूनही आपल्याकडे मुलांची नावे आली . निवृतानाथ , एकनाथ , कानिफनाथ , जालिंदरनाथ , नवनाथ ही नाथ परंपरेतून आलेली नावे . रामायण , महाभारतातील व्यक्तीरेखांवरुनही नावे आली . रामदास शब्दातील दास हे पद योजून भानुदास , रेणुकादास आणि येशूदास अशीही विशेषनामे झाली . सूर्याला प्रभाकर , दिनकर , भास्कर , रवी म्हणतात . ही सूर्यनामे व्यक्तीनामे झाली मग चंद्र कशाला मागे राहिल . शशी , शशीकांत , शशांक ही चंद्राची नावे मुलांना मिळाली तर त्यांचे प्रकाश किरणांनीही व्यक्तीनामाचा रस्ता धरला . रोहिणी , अनुराधा ,विशाखा , चिञा, स्वाती, फाल्गुणी, कृतिका , रेवती , आश्विनी ही नक्षञे आणि मराठी मासनामेही मुलामुलींना दिली गेली .वसंत,हेमंत, शरद, शिशिर , वर्षा हे ऋतुही विशेषनामे ठरली. ईश्वर हे पद नावात योजून योगेश्वर , रामेश्वर , जोगेश्वरी अशी नावेही मुलामुलींना दिली गेली . १९६० च्या दशकात अशी नावे अधिक सापडत .

            रामनगरीत राम नगरकरांनी एक फर्मास किस्सा ऐकवला आहे . नवरदेव असणा-या रामचंद्र तथा रामला तहान लागते . गंगामावशी , गोदूमावशी , यमुनामावशी यांच्याकडे तो पाणी मागतो पण नद्यांची नावं असणा-या या मावश्या लगीनघाईत नवरदेवाला पाणी द्यायचे विसरुन जातात . गंगा , सिंधू , सरस्वती , कावेरी , यमुना , शरयू या नद्यांची नावे स्ञीनामे झाली . स्ञीनामात देवी महात्म्य जसे सापडते तसे नद्यामहात्म्यही सापडते .स्ञीनामे भाववाचक नामातूनही आलेली दिसतात . सुंदर , सुमन ही स्ञीनामे या प्रकारातली .स्ञी आणि सौंदर्य याला महत्व आहे . स्वर्गातील अप्सरा,  मेनका , रंभा , उर्वशी या त्यातूनच पृथ्वीवरही अवतरल्या .तरी स्ञीनामात नकुशी ( नकोशी ) असेही नाव मुलीला दिले गेले . मुलगा झाला तर आनंद व्यक्त करणारा समाज मुलगी नको हा विचार नकुशी या नावातून तर व्यक्त करत नसतील ? मध्यंतरी सुप्रिया सुळे यांनी या नकोश्या मुलींची नावे तेजस्विनी करण्याचा कार्यक्रम घेवून आमच्या नकोश्या विचारांना तेजस्वी बनविले होते . माझे एक प्राचार्य मिञ आहेत डाॅ के एन गणगे . एका कार्यक्रमात मला त्यांच्याविषयी बोलायचे होते . मी मराठीचा बरा अभिमानी आणि आद्याक्षर प्रथेचा समर्थक नसल्याने सरांना के फाॅर काय ? असे सरळच विचारले . ते क्षणभर गप्प झाले . विक्षानशाखेतील पीएच डी धारक आणि प्राचार्यांसमोर असे धाडस कोण करणार ? सरांनी काही क्षणांनी आपले मराठी नाव सांगितले कचरु . विशेषनामात अशी दगडू , धोडू , कचरू अशी नावे काही मुलांना का ठेवत असतील ? त्याचेही उत्तर नंतरच्या काळात मिळाले . रोगराईपसरली की मुलं दगावत . एखाद्या घरात मुल जगत नसे . घरात मुल जगावं , कुणाची दृष्ट लागू नये म्हणून मुलांची नावे कचरु , दगडू , धोंडू अशी ठेवित असत . कचरा , दगड , गोटे असणारी ही मुले जगत असत आणि उंच भरारी घेत असत . प्राचार्य डाॅ के एन गणगे यांनी पंढरपूर काॅलेजला नॅकच्या मानांकनात अग्रस्थान मिळवून दिले हा त्याचा पुरावा . कचरु , दगडू , नकुसा ही नावे ग्रामीण भागात आणि ब्राह्मणेतर , दलित समाजात ठेवली जात . त्यातून लोकसंस्कृती ध्वनीत होत असे . अर्थात १९५६ मध्ये डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी बौध्दधम्म स्वीकारला आणि मुलामुलींची नावेही बदलली . सम्राट अशोक , राजा हर्षवर्धन , गौतम . सिध्दार्थ , महेंद्र , राहुल , मिलींद  अशी बौध्द राजे व तत्वज्ञानी यांची नावे मुलांना मिळाली . धम्मसंगिनी , संघमिञा ही मुलींची नावे आली . बुध्दभूषण हे नावही त्याच परंपरेतले . हा खुलासा नरेंद्र जाधव यांचे भाषणातून झाला . ही दृष्टी बौध्दधम्मातून आली .

           राजे व पराक्रमी पुरुषांची नावेही मुलामुलींना दिली गेली . शिवाजी , संभाजी , येसाजी ( यशवंत ) , राजाराम , तानाजी ही पुरुष नामे याची निदर्शक . बहुजन समाजात ही नावे अधिक सापडतात . राजा म्हणजे इंद्र . राजेंद्र , नरेंद्र , देवेंद्र , महेंद्र ही नावे इंद्र हे पद योजून तयार होतात . शिवाजी हे नाव ब्राह्मण समाजात फार सापडत नाही . तरी अमरावतीचे शिवाजीराव पटवर्धन यांचे नावही विसरता येत नाही . विवेकानंद या नावातले नंद हे पद घेवून अजितानंद , प्रज्ञानंद अशीही नावे घडवली गेली . विशेषतः साधू महाराजांच्या नावात नंद हे पद योजून विशेषनामे घडविली जातात .उदा . स्वरुपानंद . इंग्रजीच्या प्रभावातून साहेब हे पद योजून नावे घडविली गेली . राव हे पद बायकांचे आवडते . उखाणा घेतांना रावांचे नाव घेते तुमचा मान राखून असे यमक जुळविलेले दिसते . साहेबराव हे त्याचे ठळक उदाहरण .  नाशिक नगरजिल्हयात अण्णासाहेब , रावसाहेब , भाऊसाहेब , नानासाहेब अशी नावे सापडतात . घरातील प्रमुखाला कारभारी म्हणतात . पतीला कारभारी म्हण्याची प्रथा होती . त्यातून कारभारी हे विशेषनामही आले .

           नागराज मंजुळे यांची शाॅर्टफिल्म होती “ पिस्तुल्या “ हा पिस्तुल्या कोण ? फासे पाथधी समाजातील एक मुलगा . फासेपारधी समाज अजूनही खूप मागे आहे . शिक्षणापासून दूर असणारी फासेपारधी जमात  गुन्हेगारीसाठी प्रसिध्द आहे . त्यातल्या मुलांची नावे डॅशिंग , डेरिंग , झटक्या , चिणपाट अशी ठेवलेली आढळतात . हिंदी इंग्रजी भाषेचे मिश्रण असणारी शायनिंग , बिस्कीटया , टेलरिंग , खटपटया , जंक्शन , गुगली , पावडर ही नावे फासेपारध्यांचीच . बारक्या , झारमड , कुडमुडया , लुकतुक्या ही फासेपारध्यांची नावे प्रकृतीधर्मावरुन घेतलेली असावी . रोशन , गुलशन ही त्यापैकी शोभिवंत नावे . फासेपारधी समाज शिक्षण प्रवाहात येवून संस्कृतीकरणाची वाटचाल करील तेंव्हा ही नावे बदलतील पण आज माञ पुस्तूल्याचे वास्तवच आपल्याला स्वीकारावे लागते .

           ख्रिस्ती समाजातही संतांची नावे मुलामुलींना मिळालेली दिसतात . ख्रिस्ती मिशन-यांनी धर्म प्रसार करुन इंडियन ख्रिस्ती समाज निर्माण झाला . ख्रिस्ती संतांची मोठी परंपरा त्या धर्मात आहे .फ्रान्सिस वाघमारे यांचे वडील मुरलीधर वाघमारे यांनी ख्रिस्तीधर्म स्वीकारल्यावर आपल्या मुलांची नावे लुईस , ऑगस्टीन , मेरी , अॅग्नेस , मार्था , मारिया , तेरेसा , वेरोनिका , एलिझाबेथ अशी ठेवली . पिटर , पाॅल , मार्टीन , अॅन्थोनी , जेकब , जोसेफ , ऑगस्टीन , सॅम्युल , मार्क , मॅथ्यू , मोझेस , अब्राहम ही नावे ख्रिस्ती संतांची किंवा तत्वज्ञांची तरी असतील . तिच गोष्ट मुस्लिम समाजातही दिसून येईल . अल्लाची शंभर नावे मुलांना दिली आहेत . रहमान , मलिक , अजिज , जब्बार , गफ्फार , वहाब , रज्जाक , अलिम , खाफिद , अली , हफिज , मुक्तदीर , वाली , रऊफ , वारिस , रशिद , मुजीब , हकीम , कय्यूम, वाजिद , कादीर ही प्रेषिताचीच नावे आहेत . आपण वकील नेमतो . हा वकील म्हणजे साक्षात प्रेषितच . मुस्लिम समाजात पराक्रमी पुरुषांची  , सुफी संतांची आणि शायरांची नावेही घेतलेली दिसतील . आदम , आयुब हे पराक्रमीच योध्देच होते. ख्वाजा , दस्तगीर , निजामुद्दीन , मीर तकी मीर हे सुफी संत होते . मुस्लिमांचे पविञ महीने रमजान , शाबान यावरुनही मुलांची नावे सापडतात . आमचे मार्गदर्शक प्रा . प्रमोद वागदरीकरांनी मुलीचे नाव सकीना ठेवलेले होते . सकीना ही पैगंबर साहेबांची मुलगी . डाॅ नरेंद्र दाभोळकरांचा हमीद हे नाव मुस्लिम संस्कृतीतूनच आले .निळू फुले यांच्या मुलीचे नाव गार्बो . आमच्या घरात मूल जन्माला आले तेंव्हा साधनाचे संपादक यदूनाथ थत्ते यांनी बौध्द तत्वज्ञानातील , परंपरेतील नावे पञाने कळविली होती . आनंदवर्धन , गुणवर्धन , स्नेहवर्धन , हर्षवर्धन , शीलभद्र अशी काही नावे सुचविली होती . हर्षवर्धनला कुसुमाग्रजांचे अनुमोदन मिळाले . धर्मनिरपेक्ष तत्वज्ञान मानणा-या माणसांनी जाणिवेच्या पातळीवर अशी नावे ठेवलेली दिसतात .

       ख्रिस्तीधर्मांतराची लाट स्वातंञ्यानंतर ओसरली आणि मिशन-यांच्या शाळेत घालणे गरजेचे राहीले नाही . मुलांची नावे ऑगस्टीन असेल तर आनंद , अनंत करण्याची प्रवृत्ती बळावली . सुवार्ताचे स्वार्था नाव त्यातून पुढे आले . प्रत्येक काळात काही एक नाव ठेवण्याची प्रवृत्ती दिसते . अशोक हे नाव एका गावात अनेक मुलांचे ठेवले गेले . माझे मिञ ज्ञानोबा ढगे यांचे गावात ज्ञानोबा नावाची सतरा मुले होती . पुढील काळात सृष्टी हे मुलीचे नाव ठेवण्याची क्रेझ निर्माण झाली आणि अनेकजणींचे नाव सृष्टी ठेवले गेले . नाम महात्म्यात काळाचा महिमाही दिसून येतो .

            काळ बदलला . नाममहात्म्यातही बदल झाला . मुलामुलींच्या नावातही कितीतरी छटा आल्या . कालची संगिता आज स्वरा झाला . ऋतुजा , क्षितीजा , संहिता अशी मुलींची नावे आली . ऐश्वर्या हे फक्त नटीचे नाव राहीले नाही . ऋत्विक असे मुलाचे नावही आले . श्लोक , ओवी , गाथा ही परंपरेतील नावे नव्याने रुढ झाली .आमच्या रणुकाका गुजरांनी पहिल्या मुलीचे नाव ठेवले मेघा . नंतरच्या मुलीचे नाव वर्षा . तिसरी मुलगी झाली . तिचे नाव ठेवले सरिता आणि शेवटी घरात जन्मला तो सागर . मेघा, वर्षा, सरिता , सागर अशी अन्वयर्थक नावे देणारे पालक आज वाढले आहे . एकल कुटुंबात जन्मणा-या बाळाचे नाव हटके ठेवण्याकडे मातापित्यांचा कल आहे . काळ बदलला आणि नाममहात्म्यही बदलत गेले .

           

डाॅ शंकर बो-हाडे

९२२६५७३७९१

नाममहात्म्य

( आड ) नावात काय असतं ? या लेखात आडनावाची रंजकता मी मांडली होती . आडनावात इतिहास , आख्यायिका , वैशिष्टय पूर्णता असते . काही आडनावे निर्थकही असतात . पण आपली ओळख असणारे नाव हे विशेष नाम असते . त्यामागेही परंपरा , संस्कृती असते . भक्तीभाव किंवा विचार , संस्कारही असतात . माझे नाव शंकर . हे ठेवण्यामागे आई वडीलांची श्रध्दा दिसून येते . माझ्याआधीची अपत्ये जगत नव्हती . आईवडील नारोशंकराला गेले . नवस केला . मुलगा झाला तर त्याचे नाव शंकर ठेवू . आम्ही जन्मलो , जगलो . शंकर या नावाची अशी अख्यायिका आई सांगते . शंकराचे नाव महादेव . त्याचा अपभ्रंश महादू . विरुपाक्ष हे नावही शंकराचेच . निलकंठ , निलेश हे नावही याच परंपरेतले . देवतांच्या नावावरुन मुलांना नावे दिल्याची हजारो उदाहरणे सापडतात . गणांचा अधिपती तो गणपती . एकट्या गणपतीची कितीतरी नावे मुलांना ठेवलेली दिसतील . गणेश , गणपती , गजानन अशी चिक्कार नावे सांगता येतील . हेरंब हे नावही गणेशाचेच . पण वक्रतुंड , एकदंत अशी गणपतीची नावे काही व्यक्तीनामात सापडत नाही . मारोती , बजरंग ही नावे मुलांना शोभतात . राम, रामचंद्र ,रामभाऊ ही देवतेचीच . एखाद्या व्यक्तीचे नाव रावणही असू शकेल . पण दशानन सापडणार नाही . दशमुखे हे आडनाव असू शकेल . विष्णू , दत्त या देवतांवरुनही नावे सापडतात .  लक्ष्मी , रेणुका , अंबा , सरस्वती ही स्ञीनामे देवतेचीच . मुलींच्या नावातही देवता महात्म्य सापडते . ग्रामीण भागात वारकरी परंपरा मानणा-या माणसांनी मुलांना विठ्ठल , विठोबा. मुलींना रुक्मिणी , रखमा ही नावे दिली . आमचेकडे शिक्षणाने अद्याक्षरावरुन ओळख सांगण्याची प्रथा पडली . एस एम जोशी हे श्रीधर महादेव जोशी आहेत हे कुणाला माहित नसते . तसेच प्राचार्य पी व्ही रसाळ हे आमचे मिञ . मी पी. व्ही. या अद्याक्षरातील नावाचा शोध घेतला तेंव्हा पी फाॅर पुंडलिकचा उलगडा झाला . साहजिक विठ्ठलाचा व्ही झाला . विठ्ठलाच्याच घरात पुंडलिक आणि जनाबाईही होतीच . पंढरपूर म्हणजे विठ्ठलाची पंढरी . पंढरी , पंढरीनाथ ही नावेही वारकरी परंपरेतली . पांडुरंग हा विठ्ठलच . विठ्ठलाचे भक्त असणारे निवृत्ती ,ज्ञानेश्वर (ज्ञानोबा ) , सोपान , मुक्ताबाई , एकनाथ , नामदेव , तुकाराम ही विशेष नामेही वारकरी परंपरेतून आली . सावळया विठठ्लाचे नावावरुन सावळीरामही आलेच . नाथ परंपरेतूनही आपल्याकडे मुलांची नावे आली . निवृतानाथ , एकनाथ , कानिफनाथ , जालिंदरनाथ , नवनाथ ही नाथ परंपरेतून आलेली नावे . रामायण , महाभारतातील व्यक्तीरेखांवरुनही नावे आली . रामदास शब्दातील दास हे पद योजून भानुदास , रेणुकादास आणि येशूदास अशीही विशेषनामे झाली . सूर्याला प्रभाकर , दिनकर , भास्कर , रवी म्हणतात . ही सूर्यनामे व्यक्तीनामे झाली मग चंद्र कशाला मागे राहिल . शशी , शशीकांत , शशांक ही चंद्राची नावे मुलांना मिळाली तर त्यांचे प्रकाश किरणांनीही व्यक्तीनामाचा रस्ता धरला . रोहिणी , अनुराधा ,विशाखा , चिञा, स्वाती, फाल्गुणी, कृतिका , रेवती , आश्विनी ही नक्षञे आणि मराठी मासनामेही मुलामुलींना दिली गेली .वसंत,हेमंत, शरद, शिशिर , वर्षा हे ऋतुही विशेषनामे ठरली. ईश्वर हे पद नावात योजून योगेश्वर , रामेश्वर , जोगेश्वरी अशी नावेही मुलामुलींना दिली गेली . १९६० च्या दशकात अशी नावे अधिक सापडत .

            रामनगरीत राम नगरकरांनी एक फर्मास किस्सा ऐकवला आहे . नवरदेव असणा-या रामचंद्र तथा रामला तहान लागते . गंगामावशी , गोदूमावशी , यमुनामावशी यांच्याकडे तो पाणी मागतो पण नद्यांची नावं असणा-या या मावश्या लगीनघाईत नवरदेवाला पाणी द्यायचे विसरुन जातात . गंगा , सिंधू , सरस्वती , कावेरी , यमुना , शरयू या नद्यांची नावे स्ञीनामे झाली . स्ञीनामात देवी महात्म्य जसे सापडते तसे नद्यामहात्म्यही सापडते .स्ञीनामे भाववाचक नामातूनही आलेली दिसतात . सुंदर , सुमन ही स्ञीनामे या प्रकारातली .स्ञी आणि सौंदर्य याला महत्व आहे . स्वर्गातील अप्सरा,  मेनका , रंभा , उर्वशी या त्यातूनच पृथ्वीवरही अवतरल्या .तरी स्ञीनामात नकुशी ( नकोशी ) असेही नाव मुलीला दिले गेले . मुलगा झाला तर आनंद व्यक्त करणारा समाज मुलगी नको हा विचार नकुशी या नावातून तर व्यक्त करत नसतील ? मध्यंतरी सुप्रिया सुळे यांनी या नकोश्या मुलींची नावे तेजस्विनी करण्याचा कार्यक्रम घेवून आमच्या नकोश्या विचारांना तेजस्वी बनविले होते . माझे एक प्राचार्य मिञ आहेत डाॅ के एन गणगे . एका कार्यक्रमात मला त्यांच्याविषयी बोलायचे होते . मी मराठीचा बरा अभिमानी आणि आद्याक्षर प्रथेचा समर्थक नसल्याने सरांना के फाॅर काय ? असे सरळच विचारले . ते क्षणभर गप्प झाले . विक्षानशाखेतील पीएच डी धारक आणि प्राचार्यांसमोर असे धाडस कोण करणार ? सरांनी काही क्षणांनी आपले मराठी नाव सांगितले कचरु . विशेषनामात अशी दगडू , धोडू , कचरू अशी नावे काही मुलांना का ठेवत असतील ? त्याचेही उत्तर नंतरच्या काळात मिळाले . रोगराईपसरली की मुलं दगावत . एखाद्या घरात मुल जगत नसे . घरात मुल जगावं , कुणाची दृष्ट लागू नये म्हणून मुलांची नावे कचरु , दगडू , धोंडू अशी ठेवित असत . कचरा , दगड , गोटे असणारी ही मुले जगत असत आणि उंच भरारी घेत असत . प्राचार्य डाॅ के एन गणगे यांनी पंढरपूर काॅलेजला नॅकच्या मानांकनात अग्रस्थान मिळवून दिले हा त्याचा पुरावा . कचरु , दगडू , नकुसा ही नावे ग्रामीण भागात आणि ब्राह्मणेतर , दलित समाजात ठेवली जात . त्यातून लोकसंस्कृती ध्वनीत होत असे . अर्थात १९५६ मध्ये डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी बौध्दधम्म स्वीकारला आणि मुलामुलींची नावेही बदलली . सम्राट अशोक , राजा हर्षवर्धन , गौतम . सिध्दार्थ , महेंद्र , राहुल , मिलींद  अशी बौध्द राजे व तत्वज्ञानी यांची नावे मुलांना मिळाली . धम्मसंगिनी , संघमिञा ही मुलींची नावे आली . बुध्दभूषण हे नावही त्याच परंपरेतले . हा खुलासा नरेंद्र जाधव यांचे भाषणातून झाला . ही दृष्टी बौध्दधम्मातून आली .

           राजे व पराक्रमी पुरुषांची नावेही मुलामुलींना दिली गेली . शिवाजी , संभाजी , येसाजी ( यशवंत ) , राजाराम , तानाजी ही पुरुष नामे याची निदर्शक . बहुजन समाजात ही नावे अधिक सापडतात . राजा म्हणजे इंद्र . राजेंद्र , नरेंद्र , देवेंद्र , महेंद्र ही नावे इंद्र हे पद योजून तयार होतात . शिवाजी हे नाव ब्राह्मण समाजात फार सापडत नाही . तरी अमरावतीचे शिवाजीराव पटवर्धन यांचे नावही विसरता येत नाही . विवेकानंद या नावातले नंद हे पद घेवून अजितानंद , प्रज्ञानंद अशीही नावे घडवली गेली . विशेषतः साधू महाराजांच्या नावात नंद हे पद योजून विशेषनामे घडविली जातात .उदा . स्वरुपानंद . इंग्रजीच्या प्रभावातून साहेब हे पद योजून नावे घडविली गेली . राव हे पद बायकांचे आवडते . उखाणा घेतांना रावांचे नाव घेते तुमचा मान राखून असे यमक जुळविलेले दिसते . साहेबराव हे त्याचे ठळक उदाहरण .  नाशिक नगरजिल्हयात अण्णासाहेब , रावसाहेब , भाऊसाहेब , नानासाहेब अशी नावे सापडतात . घरातील प्रमुखाला कारभारी म्हणतात . पतीला कारभारी म्हण्याची प्रथा होती . त्यातून कारभारी हे विशेषनामही आले .

           नागराज मंजुळे यांची शाॅर्टफिल्म होती “ पिस्तुल्या “ हा पिस्तुल्या कोण ? फासे पाथधी समाजातील एक मुलगा . फासेपारधी समाज अजूनही खूप मागे आहे . शिक्षणापासून दूर असणारी फासेपारधी जमात  गुन्हेगारीसाठी प्रसिध्द आहे . त्यातल्या मुलांची नावे डॅशिंग , डेरिंग , झटक्या , चिणपाट अशी ठेवलेली आढळतात . हिंदी इंग्रजी भाषेचे मिश्रण असणारी शायनिंग , बिस्कीटया , टेलरिंग , खटपटया , जंक्शन , गुगली , पावडर ही नावे फासेपारध्यांचीच . बारक्या , झारमड , कुडमुडया , लुकतुक्या ही फासेपारध्यांची नावे प्रकृतीधर्मावरुन घेतलेली असावी . रोशन , गुलशन ही त्यापैकी शोभिवंत नावे . फासेपारधी समाज शिक्षण प्रवाहात येवून संस्कृतीकरणाची वाटचाल करील तेंव्हा ही नावे बदलतील पण आज माञ पुस्तूल्याचे वास्तवच आपल्याला स्वीकारावे लागते .

           ख्रिस्ती समाजातही संतांची नावे मुलामुलींना मिळालेली दिसतात . ख्रिस्ती मिशन-यांनी धर्म प्रसार करुन इंडियन ख्रिस्ती समाज निर्माण झाला . ख्रिस्ती संतांची मोठी परंपरा त्या धर्मात आहे .फ्रान्सिस वाघमारे यांचे वडील मुरलीधर वाघमारे यांनी ख्रिस्तीधर्म स्वीकारल्यावर आपल्या मुलांची नावे लुईस , ऑगस्टीन , मेरी , अॅग्नेस , मार्था , मारिया , तेरेसा , वेरोनिका , एलिझाबेथ अशी ठेवली . पिटर , पाॅल , मार्टीन , अॅन्थोनी , जेकब , जोसेफ , ऑगस्टीन , सॅम्युल , मार्क , मॅथ्यू , मोझेस , अब्राहम ही नावे ख्रिस्ती संतांची किंवा तत्वज्ञांची तरी असतील . तिच गोष्ट मुस्लिम समाजातही दिसून येईल . अल्लाची शंभर नावे मुलांना दिली आहेत . रहमान , मलिक , अजिज , जब्बार , गफ्फार , वहाब , रज्जाक , अलिम , खाफिद , अली , हफिज , मुक्तदीर , वाली , रऊफ , वारिस , रशिद , मुजीब , हकीम , कय्यूम, वाजिद , कादीर ही प्रेषिताचीच नावे आहेत . आपण वकील नेमतो . हा वकील म्हणजे साक्षात प्रेषितच . मुस्लिम समाजात पराक्रमी पुरुषांची  , सुफी संतांची आणि शायरांची नावेही घेतलेली दिसतील . आदम , आयुब हे पराक्रमीच योध्देच होते. ख्वाजा , दस्तगीर , निजामुद्दीन , मीर तकी मीर हे सुफी संत होते . मुस्लिमांचे पविञ महीने रमजान , शाबान यावरुनही मुलांची नावे सापडतात . आमचे मार्गदर्शक प्रा . प्रमोद वागदरीकरांनी मुलीचे नाव सकीना ठेवलेले होते . सकीना ही पैगंबर साहेबांची मुलगी . डाॅ नरेंद्र दाभोळकरांचा हमीद हे नाव मुस्लिम संस्कृतीतूनच आले .निळू फुले यांच्या मुलीचे नाव गार्बो . आमच्या घरात मूल जन्माला आले तेंव्हा साधनाचे संपादक यदूनाथ थत्ते यांनी बौध्द तत्वज्ञानातील , परंपरेतील नावे पञाने कळविली होती . आनंदवर्धन , गुणवर्धन , स्नेहवर्धन , हर्षवर्धन , शीलभद्र अशी काही नावे सुचविली होती . हर्षवर्धनला कुसुमाग्रजांचे अनुमोदन मिळाले . धर्मनिरपेक्ष तत्वज्ञान मानणा-या माणसांनी जाणिवेच्या पातळीवर अशी नावे ठेवलेली दिसतात .

       ख्रिस्तीधर्मांतराची लाट स्वातंञ्यानंतर ओसरली आणि मिशन-यांच्या शाळेत घालणे गरजेचे राहीले नाही . मुलांची नावे ऑगस्टीन असेल तर आनंद , अनंत करण्याची प्रवृत्ती बळावली . सुवार्ताचे स्वार्था नाव त्यातून पुढे आले . प्रत्येक काळात काही एक नाव ठेवण्याची प्रवृत्ती दिसते . अशोक हे नाव एका गावात अनेक मुलांचे ठेवले गेले . माझे मिञ ज्ञानोबा ढगे यांचे गावात ज्ञानोबा नावाची सतरा मुले होती . पुढील काळात सृष्टी हे मुलीचे नाव ठेवण्याची क्रेझ निर्माण झाली आणि अनेकजणींचे नाव सृष्टी ठेवले गेले . नाम महात्म्यात काळाचा महिमाही दिसून येतो .

            काळ बदलला . नाममहात्म्यातही बदल झाला . मुलामुलींच्या नावातही कितीतरी छटा आल्या . कालची संगिता आज स्वरा झाला . ऋतुजा , क्षितीजा , संहिता अशी मुलींची नावे आली . ऐश्वर्या हे फक्त नटीचे नाव राहीले नाही . ऋत्विक असे मुलाचे नावही आले . श्लोक , ओवी , गाथा ही परंपरेतील नावे नव्याने रुढ झाली .आमच्या रणुकाका गुजरांनी पहिल्या मुलीचे नाव ठेवले मेघा . नंतरच्या मुलीचे नाव वर्षा . तिसरी मुलगी झाली . तिचे नाव ठेवले सरिता आणि शेवटी घरात जन्मला तो सागर . मेघा, वर्षा, सरिता , सागर अशी अन्वयर्थक नावे देणारे पालक आज वाढले आहे . एकल कुटुंबात जन्मणा-या बाळाचे नाव हटके ठेवण्याकडे मातापित्यांचा कल आहे . काळ बदलला आणि नाममहात्म्यही बदलत गेले .

           

डाॅ शंकर बो-हाडे

९२२६५७३७९१

No comments:

Post a Comment