Sunday, 14 February 2016

पाटलांची भाऊबंदकी

                                                पाटलांची भाऊबंदकी
                                                 =============
" कादंबरी " हा वाऽमयप्रकार इंग्रजी राजवटीतच जन्माला आला . गोष्ट सांगणे आणिगोष्ट ऐकणे ही मानवाची प्रधृत्ती पुरातण आहे. पुराणे , आख्अयाने , बखरी इ. ग्रंथातून कादंबरीची काही अंगोपांगे जाणवतात हे खरे आहे .1829 मध्ये पसिध्द झालेल्या ' महाराष्ट्र भाषेचा कोष ' या ग्रंथात ' कादंबरी ' या शब्दाचे अर्थ देताना एक कल्पित कथा असा एक अर्थ दिला आहे .
                                                                    भालचंद्र फडके
                                                                     प्रदक्षिणा खंड -एक
                                                                     पृ 202

महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला साहित्याच्या क्षेञातील वाद संवाद आणि भाऊबंदकी नवीन नाही . साहित्याच्या क्षेञात टोकाचे वाद खेळले जातात आणि भाऊबंदकीतून घरं उजाड होतात . मागिल महिन्यात विश्वास पाटलांच्या कादंब-यांवरुन त्यांच्या भावाने वादाला तोंड फोडले . पण हा वाद काही रंगला नाही . नाक्या नाक्यावर , चौकाचौकात काही मंडळींनी हे प्रकरण चघळले आणि संपले . विश्वास पाटलांचे बंधु हे कादंबरीकार आहेत , हे फार थोड्यानाच माहित होते . या निमित्ताने त्यांचे लेखन उजेडात आले इतकेच .
             विश्शास पाटील हे लोकप्रिय लेखकांचे प्रतिनिधी . लोकप्रिय लेखकांच्या कादंब~या बेतलेल्या असतात हा आक्षेप त्यांच्यावर घेता येईल . झाडाझडती कादंबरी धरणग्रस्तांवर बेतलेली आहे .धरणग्रस्तांवर लिहीणारे विश्वासराव एकटेच नाहीत .चंद्रकांत नलगे यांच्या देवाची साक्ष बरोबरच ना. द. जोशी यांची धरण या शीर्षकाची आणखी एक कादंबरी आहे . संभाजी महाराजांवर छावा आहेच अन्य लेखकांनीही लिहीले आहे .प्रभाकर बागुल या सत्तर कादंब-या लिहीणा-या लेखकाची धर्मवीर राजे संभाजी ही कादंबरी प्रकाशनाच्या तयारीत आहे . तिची पृष्ठ संख्याच आठशे आहे .  हरीभाऊ आपटे यांनी ऐतिहासिक कादंब-या लिहून पूर्व वैभवाचे चिञ रेखाटले आहे . त्यांची ' केवळ स्वराज्यासाठी '  या कादंबरीत त्यांनी संभाजीचा वध आणि राजारामाची कारकिर्द  याचे चिञण केले आहे  .महाराष्ट्राचा आणि मराठयांचा पराक्रमाचा इतिहास प्रत्येक काळात कलावंताला आवाहन करीत असतो . आपल्या बखर वाऽमयात हे ऐतिहासिक ऐवज उपलब्ध आहे . पानिपतची बखर प्रसिध्दच आहे . गोपाळ गोविंद मुजूमदार यांच्या ' मराठेशाहीची अखेर (1931) पाणिपतचे चिञण आलेले आहे . ' नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर चरीञपर बरेच लिहून झाले आहे . महानायकपूर्वी कॅप्टन बेलवलकरांनीही नेताजींवर कादंबरी लिहील्याचे आठवते . साठोत्तरी ग्रामीण साहित्याने कृषी जीवन , उध्दवस्त खेडे , यांञिकीकरण ,  नातेसंबध याचे चिञण कले आहे .आनंद यादवांच्या गोतावळा , घरभिती , नांगरणी यामधून व्यक्त होणारा आशय अन्यही ग्रामीण लेखकांच्या लेखनात , कथा कादंबरीतही व्यक्त होतो .
                मधल्या काळात " देऊळ " हा चिञपट खूपच गाजला . त्यातील देवाच्या जन्माच्या कथेचा प्लाॅट मनोहर विभांडिक यांच्या कथेत येवून गेला होता . विभांडिक निर्मात्याववर दावा ठोकू शकत होते .पण त्यांनी तसे काही केले नाही . मला त्यांनी ती कथा वाचायला पाठविली होती . मुद्दा विश्वास पाटलांच्या कादंब-यांचा येतो . गिरणी कामगारांच्या संपाने गिरणगाव , लालबाग , परळ मधून कामगार उध्दवस्त झाला . यावर दाह ही सुरेश पाटील यांची कादंबरी आहेच . त्यावर मधल्या काळात " लालबाग परळ " असा सिनेमाही येऊन गेला . आता विश्वास पाटलांची " लस्ट फाॅर लालबाग " ही कादंबरी आली आणि तिच्या तीन महिन्यात तीन आवृत्या संपल्या आहेत . विश्वास पाटलांचे प्रकाशक तालेवार आहेत . विश्वासराव जिल्हाधिकारी आहेत . कलावंताला नव्या ग्लोबल काळात स्वतःला आपल्या प्राॅडक्टचे मार्केटींग करावे लागते . चिञपटातील तारे तारका जिल्हा पातळीवर जाऊन मार्केटींग करताना दिसतात . नाना पाटेकर-महेश मांजरेकरांनी तसे ते केले आणि चिञपटही गल्ला भरून गेला . विश्वास पाटलांनी असे अनुभव , साधना मधून केले असले तरी ते आवश्यक समजले पाहीजे . काही वर्षापूर्वी तमाशात वगनाटय होते . " रक्तात रंगली कु-हाड अर्थात सख्खे भाऊ पक्के वैरी " या पध्दतीने हे पाटलांचे विश्वासघात नाटय गाजले . वाऽमय चौ-यावर यापूर्वीही मराठीत बरेच आरोप प्रत्यारोप झाले आहेत . अगदी व्यंकटेश माडगुळकर यांच्या " सत्तांतर " कादंबरीबर असे आरोप झाले होते . या प्रकरणाला भाऊबंदीचे स्वरूप आल्याने ते फार गंभीरपणे कोणी घेतले नाही . त्याऐवजी एखाद्या नामवंत समीक्षकाने विश्वास पाटलांचा समाचार घेतला असता तर हे प्रकरण वादाचे ठरले असते .कादंबरीत कल्पित वास्तव असते . एका विशिष्ट त-हेच्या कल्पित कथेला कादंबरी हे नाव मराठीमध्ये रूढ असावे , हा प्रा कुसुमावती देशपांडे यांचा तर्क खरा मानावा लागतो . या प्रकरणी  उभय बाजूने चर्चा रंगली नाही आणि गंमतही वाटली नाही . भाऊबंदकी माञ जाहीर झाली .
डाॅ शंकर बो-हाडे / 9226573791